हल्ली कसलाच परिणाम
होत नाही माझ्यावर
सर्व त्रास, सर्व दु:खे
निमूटपणे सहन करत राहतो मी
सर्व वेदना शांतपणे भोगत राहतो मी
शेवटी मग वेदनाच कंटाळून निघून जातात
आणि चेहर्यावर उरतात फक्त काही निर्विकार भाव
काहीतरी जिंकल्याचे...
बरेच काही हरल्यानंतर...
-काव्य सागर
कुर्बान हम पे कुदरत हुई है
4 weeks ago