जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले
मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळलेझाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले
मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले
आले नव्याने बहर हे आला तसा वारा पुन्हा
मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले
फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो
मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले
-काव्य सागर