माझ्या गावी दु:खाचा पूर आला
सोबतीला आसवांचा पाऊस झाला
म्हणून मी सुतक पाळले...
जोपर्यंत सारे पूर्ववत होत नाही
...तोपर्यंत
जोपर्यंत जखम भरून येत नाही
...तोपर्यंत
कदाचित काही काळानंतर
सारे पूर्ववत होईल ही
जखमा भरून येतील ही
मग पुन्हा सुखाचे दिवस येतील
अन् सुतक संपेल ही
पण...
अशी अनेक गावे असतील
जिथे कायमचाच दुष्काळ असेल
जिथे दिवस उजाडत नसेल
जिथे शेतात फक्त काटेच उगवत असतील
जिथे सुखाचे वारे वाहत नसतील
त्यांनी का आयुष्यभर
सुतकच पाळावे ?
-काव्य सागर
नवसृष्टी
5 weeks ago

0 comments:
Post a Comment