तू सोडून गेलीस तेव्हा
आसवे गाळली नाही
स्मरणात तुझ्या मी फक्त
लिहिल्यात कविता काही
नव्हतीस सोबती म्हणुनी
मी उदास झालो नाही
पण पावसात भिजताना
मोहरलो न एकदाही
डोळ्यांना अजुनी माझ्या
विसराया जमले नाही
प्रत्येक चेहऱ्यामध्ये
ते रूप तुझेच पाही
तू येशील जर परतुनी
कधी आठव येता माझी
होतील सावळे नभ हे
गातील दिशा या दाही
ऐकून साद ह्र्दयाची
मिटवून अंतरे सारी
तू परतावे मजपाशी
हा ध्यास उराशी राही
-काव्य सागर
2 comments:
شركة رش مبيدات بالدمام
Information in Marathinice information sir
Post a Comment